( ! ) Warning: session_start(): open(/tmp/sess_6arde1itnu6d2jg2eff02mfrr0, O_RDWR) failed: No space left on device (28) in /home/goanews/public_html/includes/userdat_front.inc.php on line 16
Call Stack
#TimeMemoryFunctionLocation
10.0001370200{main}( ).../blogs_disp.php:0
20.0001370864require_once( '/home/goanews/public_html/includes/common_front.php ).../blogs_disp.php:2
30.0004379632include( '/home/goanews/public_html/includes/userdat_front.inc.php ).../common_front.php:6
40.0004379632session_start ( ).../userdat_front.inc.php:16

( ! ) Warning: session_start(): Failed to read session data: files (path: /tmp) in /home/goanews/public_html/includes/userdat_front.inc.php on line 16
Call Stack
#TimeMemoryFunctionLocation
10.0001370200{main}( ).../blogs_disp.php:0
20.0001370864require_once( '/home/goanews/public_html/includes/common_front.php ).../blogs_disp.php:2
30.0004379632include( '/home/goanews/public_html/includes/userdat_front.inc.php ).../common_front.php:6
40.0004379632session_start ( ).../userdat_front.inc.php:16
Goa News |कंटाळलेत देवही... (By: सदगुरू पाटील)

Saturday 08 August 2026

News Analysed, Opinions Expressed

कंटाळलेत देवही...

 


रात्री भेटले
देव मला
घामाघूम झालेले
मंदिरे  सोडून
एकत्र  आलेले

महाजनांचे  वाद
निधीवरून तंटे
देवळातील चोर्‍या
देवस्थान  जमिनींबाबत खटले
भक्तजनांमधील हेवेदावे
सगळ्यालाच कंटाळलेत देव

आता  देवांनीच ठरवलेय
संघटित  होऊन
सर्वांसाठी  एकच  देऊळ
बांधायचे.
सर्व  देवांनी
मूर्तीच्या  रूपात
एकाच  देवळात  बसायचे
अन् अध्यात्मिक  शांतता म्हणजे
नेमके काय ते  अनुभवायचे

निवडणुकाही  नकोत अन्
महाजनही नकोत
माणसांना तर  देवळात
प्रवेशच  नको

देवांनी, देवांसाठी बांधलेले
फक्त  देवांचे देऊळ

देऊळ  बांधकामासाठी
देवांनी  प्रसाद  लावला
प्रसाद  होऊ नये म्हणून  माणसांनी
आटापिटा केला

पण देऊळ  साकारले
देवांचा हा लोकशाही निर्धार
मला फार आवडला

आता माझ्या गावचे श्रेष्ठ 
अन्  कनिष्ठ,
जातपात विसरून
संघटित झालेत
देवांमध्ये फूट कधी पडेल
याची  वाट पाहत आहेत
देवांमध्ये  भांडण लावण्यास
निमित्त शोधत आहेत

Disclaimer: Views expressed above are the author's own.



Good one. I remembered Mangesh Padgavkar's poem on God, about God running from the temples after they were fed up with their Bhakta Jan.

 
Arvind |

Blogger's Profile

 

सदगुरू पाटील

सद्गुरू पाटील हे पेशाने पत्रकार असले तरी मनाने कवी आहेत. फेब्रुवारी 1976 मध्ये मये गावात जन्मल्यानंतर त्यांचे बालपण व शालेय शिक्षण डिचोली व सत्तरीसारख्या ग्रामीण तालुक्यांत झाले. 1996 पासून ते पत्रकारितेत आहेत. सध्या दैनिक लोकमतच्या गोवा आवृत्तीचे ब्युरो चीफ म्हणून काम पहातात. शिवाय गोवा युनियन ऑफ जर्नलिस्टचेही ते अध्यक्ष आहेत. आतापर्यंत ‘व्यक्त होताना’ व ‘टचस्क्रीन’ हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या ‘टचस्क्रीन’ला यशवंत पुरस्कार प्राप्त झालेला आहे. सध्या 60 कवितांचा तिसरा काव्यसंग्रह प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे.

 

Previous Post

 

Archives